बेरोजगारीचे भीषण व वास्तव स्वरूप
भारताने 2018 पासून लोकसंख्याशास्त्रीय सुवर्ण काळात प्रवेश केला आहे. पहिल्यांदा च भारतातील 15 ते 64 या वयोगटातील लोकसंख्या त्या वयोगटा बाहेरील लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. म्हणजे कमवू शकणाऱ्या नागरिकांची संख्या ही त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या लोकसंख्येच्या तुलनेत अधिक आहे . हा काळ 2055 पर्यंत एकूण 37 वर्षे राहण्याची शक्यता आहे . 2022 मध्ये भारताचे सरासरी वय अंदाजे 28 वर्षे आहे जे चीन व अमेरिकेमध्ये 37 आहे . ही एक मोठी संधी समजली जाते ज्याचा फायदा चीन , दक्षिण कोरिया ,जपान व थायलंड यांच्यासारख्या आशियायी देशांनी चांगल्या प्रकारे उचललेला दिसून येतो . उपलब्ध मनुष्यबळाला साजेसे उद्योग धंदे , कारखाने यांची निर्मिती त्या देशांनी केली . भारतात काय परिस्थिती आहे ? जून 2022 च्या आकडेवारी नुसार मे 2022 मध्ये उपलब्ध असणाऱ्या 40.04 कोटी नोकऱ्या 1 कोटी ने कमी होऊन 39 कोटी झाल्या . बेरोजगारी चा दर वाढून 7.8 % झाला . शहरी भागातील बेरोजगारी 7.3 % तर ग्रामीण भागातील 8.03 % आहे. मे 2016 मध्ये भारताची कार्यक्षम लोकसंख्या अंदाजे 95 कोटी होती . ज्यात पाच वर्षात अंदाजे 11 कोट...